बहुतांश लोकांना आपल्या डोळ्यांचं महत्त्व समजतं. महत्त्व कळत असलं तरी कित्येकांना डोळ्यांचं आरोग्य कसं राखायचं याची कल्पना नसते. जी माणसं दृष्टिहीन आहेत त्यांना विचारा डोळ्यांचं महत्त्व किती असतं ते. म्हणूनच आपल्याला असलेल्या डोळ्यांची काळजी आपण वेळीच घेतली तर नंतर नुकसान होणार नाही. त्यांची काळजी आपणच घेतली पाहिजे. आता तर दिवसेंदिवस उष्णता वाढत जात आहे. त्या दिवसांत डोळ्यांचे विविध आजार बळावतात. म्हणूनच आपण आपल्या डोळ्यांचं आरोग्य कसं राखलं पाहिजे, याविषयी जागतिक दृष्टी दिनानिमित्त थोडक्यात जाणून घेऊया.