Friday, December 5, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

उच्चरक्तदाब असेल तर मीठ खाऊ नये असे का सांगितले जाते ?

by प्रभात वृत्तसेवा
March 2, 2021
in आरोग्य वार्ता
A A
उच्चरक्तदाब असेल तर मीठ खाऊ नये असे का सांगितले जाते ?
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

उच्चरक्तदाब असेल तर मीठ खाऊ नये, असे सांगितले जाते. पण, अनेक रुग्णांना असं सांगितलेले आवडत नाही. मिठाशिवाय खायचे ही कल्पनाच त्यांना सहन होत नाही. पण, यामागचे शास्त्रीय कारण आपण समजावून घेऊ. म्हणजे उच्चरक्तदाब असल्यास आपण स्वतःहून मीठ न खाण्याचे ठरवू शकू.  ( salt harmful to high blood pressure )

आता मीठ काय काम करते हे पाहण्यासाठी एक उदाहरण पाहू. समजा एक कैरी घेतली. नुकतेच कैरीचे दिवस झाल्याने तुमच्या तोंडाला पाणीही सुटले असेल. तर आपण एक कैरी घेऊन चिरून ठेवून दिली तर थोड्यावेळाने काय होईल? तर, कैरी सुकून जाईल. पण, जर कैरीच्या तुकड्यांना मीठ लावून ठेवले तर काय होईल, कैरी सुकणार नाहीच. पण, कैरीवर पाणी आलेले दिसेल. कारण पाण्याला आकर्षित करण्याचा गुणधर्म मिठामध्ये आहे. आता मिठाचा हा गुणधर्म डोक्‍यात ठेवू.
आता आपल्या शरीराचा दुसरा महत्त्वाचा एक भाग, तो म्हणजे किडनी समजून घेऊ. आपल्या शरीरात सुमारे पाच लिटर रक्त वाहत असते.

एखाद्या व्यक्तीने समजा तीन ग्लास पाणी पिले. तर सुमारे अर्धा तासात ते पाणी रक्तवाहिन्यांमध्ये जाईल. म्हणजे तिथे रक्ताचे प्रमाण वाढले. त्यामुळे रक्तवाहिन्यावर दाब येईल. अशावेळी आपली कीडनी तिचे काम सुरू करते. रक्तवाहिन्यांमध्ये झालेले अतिरिक्त पाणी शोषून घेऊन, रक्तवाहिन्यांवरील दाब कमी करण्याचे काम किडनी करते.  नैसर्गिकरित्या हे अत्यंत बेमालूमपणे घडत असते. त्यात आपल्याला वेगळे काही करायची गरज नसते. पण, आपण आपल्या जीवनशैलीमुळे निसर्गाने बनविलेल्या या अत्यंत सुंदर यंत्रणेत बिघाड करतो. ते कसे, तर पहा.( salt harmful to high blood pressure )

समजा एखाद्या व्यक्तीने आधी पाच-सहा चमचे मीठ खाल्ले आणि नंतर पाणी प्यायले तर काय होईल. वर दिलेल्या कैरीच्या उदाहरणात आपण पाहिले आहे की मीठ पाणी धरून ठेवते. आपल्या रक्तवाहिन्यात गेलेले मीठ तिथे आलेल्या पाण्याला धरून ठेवते. त्यामुळे रक्तवाहिन्यांवर अधिक दाब निर्माण होतो. त्यामुळे उच्चरक्तदाब वाढतो. त्यामुळे आधीच उच्चरक्तदाब असलेल्या व्यक्तीने मीठ कमी खावे असे सांगितले जाते.( salt harmful to high blood pressure )

Tags: aarogya jagaraarogya jagar 2019aarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagarblood pressurefitnesshealthhigh blood pressuresalt harmfulskinउच्चरक्तदाब
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar