तणाव ( Mental stress ) कुणाला चुकलेला नाही. पण वंशपरंपरेसारखं एका पिढीतून पुढच्या पिढीकडे ताण-तणाव ( Mental stress ) चं हस्तांतरण होत आहे. हे गंभीर आहे. एक पिढी दुसऱ्या पिढीला तणाव ( Mental stress ) देत आहे. तणाव वाढण्याच्या अनेक कारणांपैकी हे एक महत्त्वाचं कारण आहे.
मुळामध्ये नव्या जीवनशैलीनुसार प्रचंड स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेमुळे तणाव ( Mental stress ) चं साम्राज्य दरक्षणी वाढत आहे. या तणाव ( Stress ) त फक्त लहान मुलं, शाळा-कॉलेज-एखादा नवीन अभ्यासक्रम शिकणारी मुलं, नोकरदार वर्ग नाही तर गृहिणीही गुरफटल्या आहेत. वाढती प्रलोभनं हेही तणाव वाढण्याचं महत्त्वाचं कारण ठरत आहे. अशा वाढत्या ताणतणावामुळे मन अस्थिर बनतं.
क्षणार्धात मैलोन् मैल धाव घेणाऱ्या मनाला लगाम नाही घातला तर मानसिक स्वास्थ्य बिघडतं. शारीरिक व्याधी जडतात. उच्च रक्तदाब, हृदयरोग, विविध प्रकारच्या गायनॅक समस्या याही मानसिक संतुलन बिघडल्यामुळे जडतात. मुख्य म्हणजे मधुमेहाचा आजार तणाव ( Mental stress ) मुळे बळावत आहे. पोटाचे विकारही तणावामुळे वाढत आहेत. एकंदरीत जीवनाच्या प्रत्येक क्षणाला लोकं तणावाचा सामना करतात.
ताण तणाव ( Mental stress ) चांगला की वाईट?
काही प्रमाणात निर्माण होणारा ताणतणाव ( Mental stress ) हा चांगला. जर आपल्याला अगदी उत्तम कार्यपद्धती हवी असेल तर थोडा तणाव ( Mental stress ) आवश्यक आहे. नाहीतर आपल्याकडून कुठल्याच प्रकारचं भरीव काम होणार नाही. अतिरिक्त तणाव ( Mental stress ) हा वाईटच. या तणाव( Mental stress ) चे शारीरिक आणि मानसिक परिणाम व्यक्तीला सहन करावे लागतात. म्हणजे जी माणसं सतत हसत-खेळत असतात, त्यांना कुठल्याच प्रकारचा तणाव नसतो, असं म्हणणं चुकीचं ठरेल. आपल्यावर असणारा तणाव ( Mental stress )न दाखवता काम करणं ही त्यांची कार्यपद्धती आहे.
सतत चिडणं, दुस-यांवर राग काढणं, टीका करणं, मधुमेह, उच्चरक्तदाब यांसारख्या व्याधी जडणं, मनात नको नको ते न्यूनगंड निर्माण होणं, विसरणं, अति खाणं, खोटं बोलणं, स्त्रियांमध्ये गायनॅकोलॉजिकल समस्या निर्माण होणं. याच्या जोडीने हृदयविकार वाढतो. काही लोकांना सतत शौचास, किंवा लघवीस होते. ऍसिडीटी वाढते. लहान मुलं अंथरुण ओलं करतात. मनात विचारांचा गोंधळ निर्माण होतो. व्यसनाधीनता वाढते. काही जण तर एकलकोंडे होतात. चंचलवृत्ती वाढते. एकाग्रता कमी होते. काही जणं अन्न-पाणी सोडतात. याच्या उलट काही प्रमाणापेक्षा जास्त खातात. ज्या स्त्रियांना गरोदरपणात सर्वात जास्त तणाव ( Mental stress ) असतो त्यांची अपत्य ही चंचल असतात. वृद्धांमध्ये विसराळूपणाची समस्या वाढते. तणाव ( Mental stress ) कुणाला नाही? लहान मुलांपासून ते वृद्ध सगळेच विविध प्रकारच्या ताणावाला सामोरे जातात.
लहान मुलं : आई-वडिलांमध्ये एकोपा नसणं, पालक घटस्फोटित असणं, भावडांमध्ये भेदभाव असणं, आई-वडिलांनी मुलांना वेळ न देणं यामुळे लहान मुलांमध्ये तणाव ( Mental stress )असू शकतात.गुण मिळवण्याचं ओझं, पालक-शिक्षकांच्या अवाजवी अपेक्षा, भावंडांमध्ये तुलना करणं, दोन
विद्यार्थ्यांमध्ये तुलना करणं.
नोकरदार मंडळी : कामाच्या अवाजवी अपेक्षा, कुवतीपेक्षा जास्त काम अंगावर पडणं.
गृहिणी : बहुपेडी काम करणं. म्हणजे एकाच वेळी घरच्यांचं राग, लोभ, रुसवे, फुगवे सांभाळत मुलं, नवरा, घरची मंडळी, शेजारपाजाऱ्यांशी जुळवून घेताना नाकीनऊ येणं.
उपाय काय?
सामोपचाराने समजून घेऊन, मिळून मिसळून कामं करता आली पाहिजेत. सर्वात आधी दुस-याचा विचार करायला शिकलं पाहिजे. आपल्या क्षमतांचा विचार करून कामं केली पाहिजेत. एखादं काम जमणार नसेल तर तसं वरिष्ठांना विश्वासात घेऊन ते सांगता आलं पाहिजे. पालकांनी मुलांवर त्यांच्या अपेक्षांचं ओझं लादू नये. नवरा-बायकोने एकमेकांमध्ये सुसंवाद डेव्हलप केला पाहिजे. निरपेक्ष वृत्तीने कामं करता आली पाहिजेत.
सर्वात आधी विचारांची, नात्यांची, भावानांची गल्लत करू नये. स्वीच ऑन स्वीच ऑफ होत आलं पाहिजे. याच्या जोडीला छंद जोपासा. व्यायाम करा.