[[{“value”:”
Right Way to Drinking Water : पाणी पिणं जीवनासाठी अत्यंत आवश्यक असलं तरी ते कशा पद्धतीने पितो, याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं.घाईगडबडीच्या जीवनशैलीमुळे आजकाल अनेक जण उभं राहून पाणी पितात. मात्र आयुर्वेद आणि आरोग्यतज्ज्ञांच्या मते ही सवय आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते.
आयुर्वेदानुसार पाणी पिण्याची योग्य पद्धत (Right Way to Drinking Water) शरीराच्या आरोग्यावर थेट परिणाम करते. उभं राहून पाणी (Water) पिल्यास पाणी वेगाने अन्ननलिकेतून थेट पोटात जातं. त्यामुळे पचनसंस्थेवर ताण येतो आणि दीर्घकाळात अॅसिडिटी, (Acidity) अपचन, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
तज्ज्ञांच्या मते, उभं राहून पाणी पिल्यास मूत्रपिंड (kidney) पाण्याचं योग्य प्रकारे शुद्धीकरण करू शकत नाही. यामुळे शरीरात अशुद्धता साचण्याची शक्यता वाढते. परिणामी मूत्रमार्गाचा संसर्ग किंवा किडनीशी संबंधित आजार उद्भवू शकतात.आयुर्वेदात सांगितल्यानुसार, उभं राहून पाणी पिण्यामुळे शरीरातील वात दोष बिघडतो.
वात दोष वाढल्यास त्याचा थेट परिणाम सांध्यांवर होतो. त्यामुळे गुडघेदुखी, सांधेदुखी आणि पुढे जाऊन संधिवात होण्याचा धोका वाढतो.याशिवाय उभं राहून पाणी पिताना शरीर तणावाच्या स्थितीत असतं. त्यामुळे तंत्रिका तंत्रावर ताण येतो. याउलट बसून शांतपणे पाणी पिल्यास शरीर रिलॅक्स होतं आणि पोषक घटकांचं शोषण चांगल्या प्रकारे होतं.
पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती? (Right Way to Drinking Water)
आयुर्वेदानुसार पाणी नेहमी बसून, हळूहळू घोट-घोट करून प्यावं. यामुळे पाणी शरीराच्या तापमानाशी जुळवून घेतं आणि कोणत्याही अवयवावर ताण पडत नाही.
आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, तर आजपासूनच उभं राहून पाणी (Water) पिण्याची सवय टाळण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
“}]]
