[[{“value”:”
Malaria: पावसाळ्यात मलेरियाचा धोका झपाट्याने वाढत असून यंदा जानेवारी ते सप्टेंबर या काळात दिल्लीमध्ये तब्बल २६४ रुग्ण आढळले आहेत. गेल्या पाच वर्षांतील ही सर्वाधिक संख्या मानली जात आहे. सततचा पाऊस आणि ठिकठिकाणी साचलेले पाणी यामुळे डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून मलेरियाचा फैलाव जलद गतीने होत आहे.
मलेरिया हा एनाफिलीज मादी डासांच्या चाव्यामुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. संक्रमित व्यक्तीला चावल्यानंतर तो परोपजीवी (Plasmodium) रक्तात सोडतो, ज्यामुळे लाल रक्तपेशींवर परिणाम होतो. वेळेत उपचार न झाल्यास आजार जीवघेणा ठरू शकतो.
मलेरियाचे सुरुवातीचे लक्षणे
डॉक्टरांच्या मते, सुरुवातीला मलेरियाची लक्षणे साध्या तापासारखी दिसतात आणि म्हणूनच लोक ती दुर्लक्षित करतात.
अंगात थंडी वाजणे आणि अचानक ताप येणे
डोकेदुखी, थकवा आणि घाम येणे
स्नायू व सांध्यात वेदना
भूक न लागणे, मळमळ किंवा उलटी
मुलांमध्ये चिडचिडेपणा आणि अशक्तपणा
गंभीर अवस्थेत रुग्णाला वारंवार ताप, श्वास घेण्यास त्रास, रक्ताची कमतरता, प्लेटलेट्स कमी होणे अशी लक्षणे दिसतात. काही वेळा संक्रमण मेंदूपर्यंत गेल्यास सेरेब्रल मलेरियासारखी जीवघेणी परिस्थिती उद्भवू शकते.
मलेरियामुळे होणारे दुष्परिणाम
रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होणे
सतत थकवा आणि अशक्तपणा
शरीर डिहायड्रेशनला बळी पडणे
यकृत (लिव्हर) व मूत्रपिंड (किडनी)वर परिणाम
गर्भवती स्त्रियांमध्ये रक्ताल्पता व अकाली प्रसूतीचा धोका
बचावाचे उपाय काय आहेत?
घर व परिसरात पाणी साचू देऊ नये.
मच्छरदाणीचा वापर करावा.
पूर्ण बाह्यांचे कपडे घालावेत.
दरवाजे-खिडक्यांना जाळी लावावी.
वेळोवेळी रक्ताची तपासणी करावी.
पावसाळ्यात ताप व अशक्तपणा जाणवल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे अत्यावश्यक आहे, अन्यथा मलेरिया गंभीर रूप धारण करू शकतो.
The post Malaria: मलेरियाची सुरुवातीची लक्षणे ओळखा; वेळेत उपचार न झाल्यास ठरू शकतो जीवघेणा धोका appeared first on Dainik Prabhat.
“}]]
