Friday, December 5, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

रक्तवृद्धीसाठीचे ‘हे’ घरगुती उपाय तुम्हाला माहित आहे का?

by प्रभात वृत्तसेवा
January 1, 2021
in फिटनेस
A A
रक्तवृद्धीसाठीचे ‘हे’ घरगुती उपाय तुम्हाला माहित आहे का?
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

आजकाल ऍनिमिया, रक्ताचे प्रमाण कमी, कॅल्शियम कमी असे बरेच प्रश्‍न आरोग्यविषयक सतवत असतात. शरीरात रक्ताचे प्रमाण कमी झाले की इतर समस्याही उद्‌भवू शकतात. रक्तवृद्धीसाठी काही घरगुती उपाय पुढीलप्रमाणे.

प्रात:काळी तीन केळी खाऊन दुधामध्ये साखर, इलायची मिसळून नित्य पित राहण्याने रक्ताची कमतरता दूर होते, हा एक पौष्टिक नाश्‍ता आहे. 10 औस द्राक्षांचा रस पित राहाण्याने रक्ताल्पतेत लाभ होतो.

ज्यांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असेल अशा लोकांनी लिंबू आणि टोमॅटोचा आहारात समावेश करावा. अर्धा कप आवळ्याच्या रसामध्ये 2 चमचे मध आणि थोडेसे पाणी मिसळून पिण्याने लाभ होतो. बेलाचा सुका गर वाटून घ्यावा. गरम दुधामध्ये याचे 2 चमचे आणि स्वादानुसार वाटलेली खडीसाखर मिसळून प्यावे. हे एक चांगले रक्तवर्धक टॉनिक आहे.

आपल्या आहारामध्ये बिटाचा वापर करावा. बिटाची कोशिंबीर, बिटाच्या स्लाईस किंवा टोमॅटोबिटाचे सूप घ्यावे. गाजराच्या रसामध्ये पालकचा रस मिसळून ते सकाळी घ्यावे. कांद्याचा रस अथवा रोजच्या आहारात गाजर, बीट, टोमॅटो, काकडी या सलाडमध्ये कांद्याचाही समावेश करावा. अथवा नुसता कांदा जेवणाबरोबर खाल्यास रक्तवृद्धी होते. कारण कांद्यामध्ये लोह भरपूर प्रमाणात असते.

दह्याची लस्सी रोज पिण्याने दुर्बलता कमी होते. साधारणपणे उन्हाळ्यामध्ये रोज आहारात दह्याचा वापर करावा. रोजच्या जेवणात दही आणि ताकाचा वापर केल्यास आरोग्य उत्तम राहाते. रक्ताच्या कमतरतेत दिवसातून 3 वेळा मध प्यावे. पालकाच्या रसात 2 चमचे मध मिसळून 50 दिवसापर्यंत घेतल्यास शरीरातील रक्तवाढ होते.

Tags: aarogya jagar 2019aarogya jagar 2020aarogya newsadvantagesArogyaarogya jagarArogyaparvblood pressurecholesteroldaily dietdigitalprabhatfitnesshealthhelth tipslife stylelife style aarogya jagarMAHARASHTRArajgiraskintopnewsआरोग्य जागरआहारएचआयव्हीयोग्य (Yoga)हृदयविकार
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar