Saturday, March 7, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात तब्बल ‘इतक्या’ महिलांना कर्करोगाची लक्षणे; अहवालातून धक्कादायक माहिती उघड

by
April 10, 2025
in आरोग्य वार्ता
A A
महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात तब्बल ‘इतक्या’ महिलांना कर्करोगाची लक्षणे; अहवालातून धक्कादायक माहिती उघड
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Hingoli । cancer – भारतात 2019 मध्ये 9.30 लाख जणांचा कर्करोगामुळे मृत्‍यू झाला होता. चीननंतर आशियातील सर्वाधिक रुग्‍ण भारतात आढळले आहेत. चीन आणि जपानसह भारत हे आशियातील तीन आघाडीचे देश आहेत.

जेथे 94 लाख नवीन रुग्ण आणि 56 लाख मृत्यूंसह कर्करोग हा सार्वजनिक आरोग्यासाठी अधिक गंभीर धोका बनला आहे. दरम्यान, कर्करोग हा आता असाध्य रोग राहिलेला नाही. कर्करोगाचाही पराभव होऊ शकतो.

तथापि, जेव्हा कर्करोगाचा पराभव करण्याचा विचार केला जातो तेव्हा असे म्हटले जाते की कर्करोगाच्या चारपैकी पहिल्या तीन टप्प्यापर्यंतच रुग्ण बरा होऊ शकतो. चौथ्या टप्प्यात पोहोचल्यानंतर रुग्ण काही वेळा जगू शकत नाही.

पण काही प्रकरणांमध्ये, कर्करोग चौथ्या टप्प्यात देखील पराभूत होऊ शकतो. यासाठी कॅन्सर शरीराच्या कोणत्याही भागात आहे की नाही आणि तो किती पसरला आहे हे जाणून घेणे महत्वाचे असते.

सध्या महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील तीन लाख 50 हजार महिलांच्या आरोग्यविषयक तपासणीमध्ये तब्बल 13 हजार 500 महिलांमध्ये कर्करोगाची शक्यता असल्याची लक्षणे आढळून आली आहेत.

जिल्ह्यात आठ मार्चपासून ‘संजीवन अभियान’ असे नाव देऊन तज्ज्ञ डॉक्टर याबद्दल तपासणी करत असून महिलांच्या सर्वेक्षणातून ही बाब पुढे आली आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने याबद्दल खुलासा केला आहे.

सात हजार महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा, 3500 जणींना स्तनाचा तर दोन हजार जणींना मुख कर्करोग होण्याची शक्यता असल्याचे दिसून आले आहे. या महिलांच्या पुढील तपासण्या कराव्या लागतील असे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील महिलांच्या आरोग्य तपासणीतून आढळलेल्या लक्षणांमुळे प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेमध्ये खळबळ उडाली आहे. या महिलांची पुढील तपासणी करून त्यांना कर्करोग झाला आहे का, हे तपासावे लागणार असल्याचे सांगण्यात आले.

लवकर तपासणी आणि त्यावर उपचार केले तर या रोगावर मात करता येते. त्यामुळे लातूर जिल्ह्यातही असे प्रयोग पूर्वी केले होते. आता हिंगोलीमध्येही पुढील चाचण्या व बायोप्सी चाचणी मोफत केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे या महिलांचे प्राण वाचतील.

कर्करोग काय आहे? वाचा….

कर्करोग हा पेशींच्या असामान्य वाढीचा आजार आहे. साधारणपणे आपल्या शरीरातील पेशी नियंत्रित पद्धतीने वाढतात आणि विभाजित होतात. जेव्हा सामान्य पेशींचे नुकसान होते तेव्हा ते मरतात आणि त्यांच्या जागी निरोगी पेशी येतात.

कर्करोगात, पेशींच्या वाढीवर नियंत्रण ठेवणारे सिग्नल योग्यरित्या कार्य करत नाहीत. कर्करोगाच्या पेशी वाढत राहतात आणि जेव्हा ते वाढतात तेव्हा त्यांचे कर्करोगात रूपांतर होते.

कर्करोगाच्या चार अवस्था असतात :

पहिला आणि दुसरा टप्पा :

याला प्रारंभिक अवस्था असेही म्हणतात. या चाचणीमध्ये रुग्णाला कर्करोग आहे की नाही हे कळते. वास्तविक, कर्करोगाच्या पेशी इतर पेशींना हानी पोहोचवू शकत नाहीत. आणि जरी ते इतर पेशींपर्यंत पोहोचले तरी त्यांचा वेग फारसा वेगवान नसतो.

तिसरी अवस्था :

याला मध्यवर्ती अवस्था म्हणतात. जेव्हा रुग्ण या टप्प्यावर पोहोचतो तेव्हा त्याला कर्करोगाच्या ठिकाणी तीव्र वेदना होतात. याशिवाय त्याचे वजनही झपाट्याने कमी होते. यामध्ये कर्करोगाच्या पेशी खूप वेगाने पसरतात आणि आजूबाजूच्या पेशींनाही व्यापतात. जिथे कॅन्सर आहे तिथे गाठ तयार होते आणि ती खूप मोठी होते.

चौथा टप्पा :

हा कर्करोगाचा शेवटचा टप्पा आहे. यामध्ये कॅन्सर मोठ्या प्रमाणात पसरला असून रुग्ण बरा होण्याची शक्यता फारच कमी आहे. हे जवळच्या लिम्फ नोड्समध्ये देखील पसरते. जर रुग्णावर योग्य उपचार केले तर कर्करोग वाढण्यापासून थांबवता येऊ शकतो किंवा नाहीसाही होऊ शकतो.

तज्ञांकडून काळजी घेणे आवश्यक आहे :

डॉक्टरांच्या मते कर्करोगाच्या चौथ्या टप्प्यात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेऊन काळजी घ्यावी लागते. या अवस्थेत रुग्णाचा उपचार हा कर्करोग शरीराच्या कोणत्या भागात आहे,

रुग्णाचे एकूण आरोग्य आणि उपचारादरम्यान पेशी कर्करोगावर कशी प्रतिक्रिया देतात यावर अवलंबून असते. तसेच, जर तुम्हाला काळजी वाटणारी कोणतीही लक्षणे आढळली तर लगेच डॉक्टर किंवा इतर आरोग्य सेवा व्यावसायिकांशी भेट घ्या.

Join our WhatsApp Channel

The post महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात तब्बल ‘इतक्या’ महिलांना कर्करोगाची लक्षणे; अहवालातून धक्कादायक माहिती उघड appeared first on Dainik Prabhat.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar