Monday, November 17, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

मधुमेहींनी चुकूनही करू नका ‘या’ चुका! अन्यथा साखरेची पातळी धोकादायकरित्या वाढू शकते!

by प्रभात वृत्तसेवा
September 18, 2021
in आरोग्य वार्ता
A A
मधुमेहींनी चुकूनही करू नका ‘या’ चुका! अन्यथा साखरेची पातळी धोकादायकरित्या वाढू शकते!
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पुणे – मधुमेह हा एक अतिशय ‘विचित्र’ आजार आहे, ज्यामध्ये लोकांचे जीवन पूर्णपणे बदललेले असते. साखरेची पातळी वाढण्याची भीती नेहमीच असते. या आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी सर्वात मोठी समस्या म्हणजे त्यांना भरपूर खाद्यपदार्थ टाळावे लागतात. जर हे पथ्य पाळले नाही तर साखरेची पातळी वाढेल, जे त्यांच्यासाठी घातक ठरू शकते. 

म्हणूनच साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी, डॉक्टर आणि आरोग्य तज्ञांनी सकस आहार घेण्याची, व्यायाम करण्याची आणि चांगली झोप घेण्याची शिफारस केली आहे. यासह, मधुमेही रुग्णांना तणावापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, आजकाल लोकांची जीवनशैली जशी बनली आहे, मधुमेहाचा धोका सतत वाढत आहे. चला तर मग, मधुमेहाच्या रुग्णांनी कोणत्या चुका करू नयेत ते जाणून घेऊया.

* भरपूर फळे खाणे
फळांचे सेवन प्रत्येकासाठी फायदेशीर आहे. सामान्यतः लोकांचा असा विश्वास आहे की मधुमेहाच्या रुग्णांनी फळे खाऊ नयेत, तर तसे नाही. त्यांना फक्त योग्य फळे निवडायची आहेत आणि त्याच वेळी त्यांच्या प्रमाणाची काळजी घ्यावी लागेल. जर तुम्ही जास्त प्रमाणात फळं खाल्लीत तर साखरेची पातळी वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे फळांचे योग्य प्रमाणातच सेवन करा.

* व्यायाम न करणे
चुकीची जीवनशैली केवळ रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम करत नाही तर यामुळे लठ्ठपणा आणि विविध आरोग्य समस्या देखील होऊ शकतात. म्हणूनच आपली जीवनशैली सुधारणे महत्वाचे आहे. दररोज व्यायाम करा, योगा करा आणि हे देखील लक्षात ठेवा की या रुग्णांनी नेहमीपेक्षा अधिक व्यायाम करायला विसरू नका.

* खाण्यात मोठे अंतर
बऱ्याचदा अनेकांना अशी सवय असते की सकाळी ९ वाजता नाश्ता केला तर थेट २-३ वाजता जेवण करतात. मधुमेही रुग्णांनी हे अजिबात करू नये. वास्तविक, प्रत्येक जेवणात मोठे अंतर ठेवल्याने साखरेच्या पातळीवर परिणाम होतो. म्हणूनच तज्ञ म्हणतात की एकाच वेळी जास्त खाण्याऐवजी एका वेळी कमी प्रमाणात खा आणि दोन खाण्यांमध्ये कमी अंतर ठेवा.

* मधुमेहामध्ये ‘ही’ खबरदारी आवश्यक आहे.
-जास्त प्रमाणात मीठ असलेले पदार्थ खाऊ नका.
– सकाळी नाश्ता करायला विसरू नका.
– रात्री लवकर झोपण्याची आणि सकाळी लवकर उठण्याची सवय लावा.
– दररोज योग्य प्रमाणात पाणी प्या.
– तळलेले पदार्थ किंवा फास्ट फूड खाणे टाळा.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar