Monday, April 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

पोटावरची चरबी दूर करण्यासाठी रोज सकाळी प्या ‘हे’ खास पेय

by प्रभात वृत्तसेवा
April 24, 2022
in आरोग्य वार्ता
A A
पोटावरची चरबी दूर करण्यासाठी रोज सकाळी प्या ‘हे’ खास पेय
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पोटावरची चरबी दूर करण्यासाठी रोज सकाळी प्या ‘हे’ खास पेय

April 24th, 8:36amApril 24th, 8:34am

प्रभात वृत्तसेवा

आरोग्य जागर

लठ्ठपणा ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. कारण एकदा आपले वजन वाढल्यानंतर, पुन्हा ते कमी करताना खूप त्रास सहन करावा लागतो. वजन कमी करण्यासाठी आपल्याला आहारात बदल करावा लागतो. सध्याच्या जीवनशैलीमध्ये आपण पौष्टिक अन्नापेक्षा फास्ट फूड आणि पॅक केलेल्या अन्नाचा जास्त वापर करतो. याचा परिणाम फक्त आपल्या आरोग्यावरच नाहीतर आपल्या वजनावर देखील पडतो.

ओव्याचे पाणी पोट कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. एका ग्लास पाण्यात एक मोठा चमचा ओवा घालून ते पाणी उकळा. नंतर ते पाणी कोमट करून प्या. आपण इच्छित असल्यास, ते एकाचवेळी मोठ्या प्रमाणात तयार करू शकता आणि ते एका भांड्यात ठेवू शकता. त्यानंतर, आपण दिवसभरात कधीही हे पाणी पिऊ शकता असे केल्याने, लवकरच आपल्याला चांगले परिणाम दिसतील. जर, आपण दिवसभर हे पाणी पिऊ शकत नसाल, तर किमान सकाळी रिक्त पोटी आणि जेवणानंतर नक्की प्या.

बीटचा रस वजन नियंत्रित करण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. बीटाच्या रसामध्ये कॅलरी कमी असतात आणि फॅट मुळीच नसते. त्यामुळे या रसाच्या सेवनाने वजन वाढीवर नियंत्रण मिळवता येत. बीटाच्या रसाने आपल्या दिवसाची सुरुवात केल्याने आपल्याला दिवसभर ताजेतवाने वाटते. बीटाच्या रसात लोह, मॅग्नेशियम, मॅंगनीज, सोडियम, जस्त, तांबे आणि सेलेनियम असते. ही सर्व खनिजे शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढवतात आणि दात व हाडे निरोगी ठेवतात.

पालक, मेथी, चवळी, चुका, शेपू इत्यादी भाज्यांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. कोणत्याही रोगात, डॉक्टर हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला देतात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅलरी आढळतात. यामध्ये कार्बोहायड्रेट देखील कमी प्रमाणात असतात. हिरव्या भाज्याचा रस पिल्याने आपले वजन कमी होते. यासाठी दररोज सकाळी आपण रिकाम्या पोटी एक ग्लास हिरव्या भाजीचा रस घेतला पाहिजे.

डाळिंबामुळे लठ्ठपणा नियंत्रित होतो, हे बर्‍याच अभ्यासांमध्ये सिद्ध झाले आहे. कारण डाळिंबात फायबर आणि कमी कॅलरीजयुक्त घटक असतात. हे खाल्ल्यानंतर आपल्याला भूक लागत नाही. जर आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर आपल्या आहारात डाळिंबाचा समावेश नक्कीच करा. वजन कमी करण्यासाठी डाळिंबापेक्षा त्याचा रस घ्या. यामुळे आपली पोटावरची अतिरिक्त चरबी जाण्यास मदत होते.

Digital Prabhat
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar