Saturday, November 8, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

पनीर खायला आवडतं? जरा थांबा… तुम्ही खात असलेलं पनीर बनावट तर नाही? आरोग्यावर होईल घातक परिणाम

by
October 31, 2025
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

health – पनीर हे केवळ शाकाहारी नव्हे तर मांसाहारी लोकांनाही आवडणारे खाद्यपदार्थ आहे. पनीर भुर्जी, शाही पनीर, चिल्ली पनीर अशा अनेक स्वादिष्ट पदार्थांमध्ये याचा वापर केला जातो. चवदार असण्याबरोबरच पनीरमध्ये प्रोटीन, कॅल्शियम, गुड फॅट आणि व्हिटॅमिन्स मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे मसल गेन करणारे अनेक लोक प्रोटीनसाठी पनीरचे सेवन करतात. लग्नसमारंभांपासून दैनंदिन जेवणापर्यंत पनीरला मोठी मागणी असते.

परंतु आजकाल बाजारात बनावट पनीरही मोठ्या प्रमाणावर विकले जात आहे. या बनावट पनीरमध्ये स्टार्च आणि विविध रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो, ज्यामुळे आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रश्न उभा राहतो की, जर नकली पनीर खाल्ले तर त्याचा शरीरावर काय परिणाम होतो? चला, जाणून घेऊया…

नकली पनीर तयार कसे केले जाते?
बनावट पनीर तयार करताना बेकिंग सोडा, पाम ऑइल, मैदा, डिटर्जंट यांसारख्या पदार्थांचा वापर केला जातो. काही भेसळखोर तर यासाठी कोलतार डाई, युरिया आणि सल्फ्यूरिक अॅसिडसारखे घातक रसायनेही वापरतात, जी शरीरासाठी अतिशय हानिकारक आहेत.

नकली पनीर खाल्ल्याने होणारे दुष्परिणाम :
जर पनीरमध्ये हानिकारक केमिकल्स मिसळले असतील, तर त्याचा पहिला परिणाम आपल्या पचनसंस्थेवर होतो. त्यामुळे अजीर्ण, जुलाब, उलट्या, पोट फुगणे (ब्लोटिंग) यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय फूड पॉइझनिंगचा धोकाही संभवतो.

जर पनीरमध्ये स्टार्च किंवा डिटर्जंट मिसळले असेल, तर त्वचारोग, ऍलर्जी यांसारख्या त्रासांचा धोका वाढतो. स्टार्चमुळे वजन वाढणे, मधुमेह आणि हृदयविकाराचे प्रमाण वाढू शकते. डिटर्जंटमुळे किडनी आणि लिव्हरचे नुकसान होऊ शकते.

तर युरिया किंवा कास्टिक सोडा असलेले पनीर खाल्ल्यास कर्करोगाचा धोकासुद्धा वाढतो. तथापि, एकदोन वेळा नकली पनीर खाल्ल्यास शरीराला तात्काळ हानी होत नाही, पण दीर्घकाळ असे पनीर सेवन केल्यास गंभीर आजार उद्भवू शकतात.

नकली पनीर ओळखण्याचे सोपे उपाय :
घरच्या घरी काही सोप्या पद्धतींनी तुम्ही अस्सल आणि बनावट पनीरची ओळख करू शकता:-

– फ्लेम टेस्ट (जळत्या आचेवर चाचणी)
पनीरचा एक तुकडा घ्या आणि गॅसवर मंद आचेवर ठेवा. जर त्यातून केरोसिन किंवा प्लास्टिकसारखी दुर्गंधी येत असेल, तर ते नकली पनीर आहे. याचा अर्थ त्यात डिटर्जंट किंवा साबणासारखी भेसळ आहे.

– टेक्स्चर टेस्ट (स्पर्श चाचणी)
पनीर हातात घेऊन हलके दाबा. जर ते खूपच कठीण किंवा रबरी वाटत असेल, तर ते बनावट आहे. अस्सल पनीर नेहमी मऊ आणि लवचिक असते.

– स्वाद चाचणी
पनीर चाखूनही त्याची ओळख करता येते. जर त्याचा स्वाद खट्टा, जास्त चघळावा लागणारा किंवा साबणासारखा वाटत असेल, तर त्यात भेसळ आहे.

– वॉटर इमर्शन टेस्ट (पाण्यात चाचणी)
एका ग्लासात गरम पाणी घ्या आणि त्यात पनीरचा तुकडा टाका. जर पनीर पाण्यात विरघळायला लागले किंवा पांढरा फेस निघू लागला, तर समजावे की ते नकली पनीर आहे.

तज्ज्ञांच्या मते, नकली पनीरचे नियमित सेवन केल्यास पचनसंस्थेचे विकार, लिव्हर आणि किडनीचे आजार, त्वचारोग आणि अगदी कर्करोगाचाही धोका संभवतो. त्यामुळे पनीर खरेदी करताना विश्वसनीय ठिकाणाहूनच ते घ्या आणि वरील पद्धतींनी त्याची तपासणी करून मगच सेवन करा.

Join our WhatsApp Channel

The post पनीर खायला आवडतं? जरा थांबा… तुम्ही खात असलेलं पनीर बनावट तर नाही? आरोग्यावर होईल घातक परिणाम appeared first on Dainik Prabhat.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar