मुंबई : रमजानचा पवित्र महिना सुरू आहे आणि या महिन्यात मुस्लीम बांधव 30 दिवस उपवास करतात आणि सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ते काहीही खात किंवा पीत नाहीत. उन्हाळ्यात भुकेले आणि तहानलेले राहणे कठीण होते, परंतु अल्लाहला प्रामाणिकपणे मानणारे लोक उपवास ठेवतात आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर इफ्तारी खाऊन उपवास सोडतात. इफ्तारीत अनेक प्रकारचे पदार्थ खाल्ले जातात. ज्यामध्ये खजूर देखील समाविष्ट आहे आणि खजूर खाऊन आपला उपवास सोडतात. परंतु तुम्हाला माहीत आहे का की, खजूर खाऊनच उपवास का सोडला जातो? जाणून घेऊ यामागील एक खास कारण.
वैज्ञानिक दृष्टीकोननुसार
* दिवसभर उपाशी राहिल्यानंतर शरीरात ऊर्जेची कमतरता भासते, त्यामुळे शरीराला झटपट ऊर्जेची गरज असते आणि खजूर हे असे अन्न आहे की जेवल्यानंतर शरीराला लगेच ऊर्जा मिळते.
* खजूर खाल्ल्याने इफ्तारच्या वेळी खाल्लेल्या गोष्टी व्यवस्थित पचतात आणि गॅसशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही.
* खजूरमध्ये पोषकतत्त्व मुबलक प्रमाणात असतात आणि त्यामुळे शरीराला आवश्यक फायबर देखील मिळतं. मॅग्नेशियम, तांबे, जीवनसत्त्वे, लोह आणि प्रथिने यामुळे शरीर सक्रिय राहते.
* यासोबतच खजूरमध्ये एल्केलाइन सॉल्ट असते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि रक्तदाब वाढण्याचा धोकाही कमी होतो.
* खजूर देखील सहज पचतात. यामुळेच ते रिकाम्या पोटी खाल्ल्याने शरीराला हानी होत नाही.
खजूर खाण्यामागे श्रद्धा
खजूर खाऊन उपवास सोडण्यामागे एक श्रद्धा अशी आहे की, खजूर हे इस्लामचे शेवटचे प्रेषित हजरत महंमद (प्रेषित हजरत महंमद) यांचे आवडते फळ होते. ते खजूर खाऊन उपवास सोडत असत. म्हणूनच मुस्लीम बांधव आजही ही परंपरा पाळतात.