Tuesday, June 9, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

आरोग्यवर्धक ‘मोहरी’, आहारात करते औषधाच्या रुपात काम

by प्रभात वृत्तसेवा
April 15, 2022
in लाईफस्टाईल
A A
आरोग्यवर्धक ‘मोहरी’, आहारात करते औषधाच्या रुपात काम
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पुणे – मोहरी म्हणजेच ‘राई’ आपण रोजच्या भाजीत वापरतो. ती नसेल तर भाजीत कमतरता जाणवते. तेलात मोहरी फुलटी की घराला स्वयंपाकाची चाहुल लागते. ती मोहरी आरोग्यदायी आहे. मोहरीत अनेक औषधी गुणधर्म आहेत शिवाय मोहरीच तेलही तेवढंच गुणकारी आहे. राईच्या तेलात एमयूएफए, पीयूएफ, ओमेगा ३ आणि ६, व्हिटॅमिन ई, खनिज आणि अँटी ऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात आढळून येतात.

त्याचसोबत यामध्ये अँटी मायक्रोबियल आणि अँटी इन्फ्लामेट्रीसारखे गुण असतात जे रोगप्रतिरोधक क्षमता वाढवण्यासोबत हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असतात. त्यामुळे राईचे तेल तुमच्या आहारात एका औषधा प्रमाणे काम करते.

एलर्जीपासून वाचवते – राईच्या तेलात अॅन्टी ऑक्सीड्स असतात त्यामुळे राईच्या तेलाने रोज अंगाची मसाज केल्यास फंगल इन्फेक्शन, त्वचेची आग होणे. तसेच खाज येण्याची समस्या निर्माण होणार नाही.

पचनाचे आजार दूर होतात – नियमित फोडणीत लहानसा चमचा मोहरीचा वापर केल्याने पचनक्रिया सुधारुन पोटाचे विकार दूर होतात. सर्वांना अॅसिडीटीचा त्रास असतो. म्हणून आहारात मोहरी वापरल्याने पोटाचे अनेक विकार दूर होतात. त्यामुळे पिंपल्स कमी होण्यास मदत होते. कारण पोट व्यवस्थित साफ न झाल्यास त्वचेचे आजार होण्याची शक्यता असते.

त्वचेचा रंग उजळतो – त्वचा उजळण्यासाठी आवश्यक असे अनेक गुणधर्म मोहरीच्या तेलात असतात. त्यामुळे त्वचेला कोणतेही हानी होत नाही. खोबरेल तेलात मोहरीचे तेल मिसळून चेहऱ्यावर लावल्याने रक्तप्रवाह सुधारतो आणि त्वचा उजळते. राईचे तेल शरीराला लावल्यास स्किनवर मॉइश्चरायजरचे काम करते. त्वचा कोरडी पडण्याची समस्या उद्भवत नाही. हिवाळ्याच्या दिवसांत तुमच्या टाचांना भेगा पडत असतील तर तुम्ही राईचे तेल भेगांना लावल्यास आराम मिळतो.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar